शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

सांगलीतील अनिकेतच्या खुनाचा तपास सीबीआयकडे द्या: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 22:39 IST

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी निर्दयीपणे आणि क्रूरपणे खून केला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी, कामटेला सहकार्य करणाºयांनाही अटक करापोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना पुसटशीदेखील कल्पना कशी नव्हती? मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी निर्दयीपणे आणि क्रूरपणे खून केला आहे. या प्रकरणाची राज्य शासनाने सीबीआयमार्फत त्वरित चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, तसेच आरोपींना सहकार्य करणाºयांनाही त्वरित अटक करावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.

शेट्टी म्हणाले की, केवळ दोन हजार रूपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली अनिकेतला अटक करण्यात आली होती. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. असे असताना कोठडीमध्ये असणाºया या तरूणावर रात्री थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आला. त्याला अक्षरश: उलटा टांगून पाण्यात बुडवून मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह संशयितांना अटक करून, तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.

वास्तविक पोलिस दलातीलच ही घटना आहे. त्यामुळे सीआयडीकडून योग्यरितीने तपास होईल असे वाटत नाही. वारणानगर येथील पोलिसांनी टाकलेल्या दरोड्याचा तपासदेखील संथगतीने सुरू आहे. जिल्'ात गुन्हेगारी विश्वाने तोंड वर काढले आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांचे लक्ष नाही. चिरीमिरीमुळे बिनदिक्कतपणे चालणाºया अवैध व्यवसायांकडे पोलिस दलाचे लक्ष नाही. पोलिसच जर असे वागू लागले, तर न्याय कोणाकडे मागायचा? जिल्'ाचा बिहार होऊन बसलेला आहे, तरीही गृहखाते मूग गिळून गप्प आहे.

दोषी लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. त्यामुळे पोलिस दलाची बदनामी होत आहे. अनिकेतच्या खुनामागे नेमका कोणाचा हात आहे? त्याला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. एवढी मोठी घटना घडूनदेखील पोलिस अधीक्षक शिंदे, पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना पुसटशीदेखील कल्पना कशी नव्हती? अनिकेत कोठडीतून पळून गेला आहे, अशा बतावण्या करण्यात आल्या होत्या.

या सर्व पार्श्वभूमीवर सीआयडीकडून या प्रकरणाचा योग्यरित्या तपास होईल असे वाटत नाही. त्यामुळे हे खून प्रकरण आणि वारणानगर येथील पोलिसांनी मारलेल्या कोट्यवधी रूपयांच्या डल्ल्याचे प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा तपास त्वरित सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :PoliceपोलिसRaju Shettyराजू शेट्टी